Team Agrowon
जीवनसत्त्व क आणि तंतूमय घटकांचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्याचा धोका टळतो.
कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तसेच तंतूमय घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन घटवण्यासाठी पपई फायदेशीर ठरते.
रोगप्रतिकारशक्ती मजबूतीसाठी आवश्यक असलेले जीवनसत्त्व ‘क’ पपईद्वारे मुबलक प्रमाणात मिळते.
चवीला गोड असली तरीदेखील रक्तातील साखर वाढत नाही. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे.
जीवनसत्त्व अ मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.
जीवनसत्त्व क प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन उपयुक्त आहे. जीवनसत्त्व क घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.