Team Agrowon
काही शेतकऱ्यांना वाटत शेतात शेणखत टाकल की झाल आता जमिनीला काही देण्याच गरज नाही पण तस नाही.
रासायनिक खतांच्या तुलनेमध्ये शेणखतातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण हे कमी असतं. पण शेणखतामध्ये सेंद्रिय पदार्थांच प्रमाण जास्त असल्यामुळे जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होत.
थोडक्यात शेणखत हे भूसुधारक म्हणून काम करत. शेणखतामुळे जमिनीत ॲझेटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू यासारखे अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जिवाणू वाढतात.
तुम्ही जर नियमित शेणखताचा वापर करत असाल तर जमिनीत गांडुळांचही प्रमाण वाढत. पिकाच्या पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होते.
जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
जमिनीच्या सामूमध्येही अपेक्षित बदल होतात.
पण हे फायदे तेंव्हाच मिळतात जेंव्हा शेणखत व्यवस्थित कुजलेल असेल.
कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताच तापमान वाढून जमिनीती मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा पिकाच्या मुळाला शॉक बसतो. त्यामुळे उत्पादनात घट येते.