Mahesh Gaikwad
'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' असे आपण म्हणतो. कारण रक्तदान केल्यामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो.
रक्तदान मानवतेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे दान आहे. जगात एवढी संशोधने झाली आहेत परंतु रक्ताला आतापर्यंत पर्याय नाही सापडला.
जगभरात १४ जून हा दिवस 'जागितक रक्तदाता दिन' म्हणून साजरा केला जातो.
रक्तदाना विषयी अधिकाधिक लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
आपल्या आसपासचे ओळखीचे अनेक लोक रक्तदान करतात. पण काही लोक अजूनही भीतीपोटी रक्तदान करत नाहीत.
आज आपण रक्तदान करण्याचे काय महत्त्व आहे, याची माहिती पाहणार आहोत.
ज्यांचे आरोग्य स्वस्थ आहे आणि ज्यांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, असे लोक नियमितपणे रक्तदान करू शकतात.
रक्तदान केल्यामुळे शरीरातील ताज्या रक्तकोशिकांच्या उत्पादनाची क्षमता वाढते.
याशिवाय रक्तदानामुळे हिमोग्लोबीन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
ज्यांना ह्रदय, किडनी, मधुमेह आणि कर्करोगासारखे आजार असतील, अशांनी रक्तदान करू नये.
याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्ग झालेला असेल, तरीही रक्तदान करू नये.
गर्भवती महिलांनी किंवा बाळंतपण झाल्यानंतर एक वर्षापर्यंत रक्तदान करू नये.