Mahesh Gaikwad
आजकालच्या धकाधकीच्या जीनवात आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही.
बदलती जीवनशैली आणि कॉम्प्युटर, मोबाईलचा वाढता वापर यामुळे अनेकांना डोळ्यांच्या समस्या जाणवू लागल्या आहेत.
डोळे हा आपल्या शरिरारीत अवयवांपैकी सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. आजकाल लहानांपासून मोठ्यांना मोबाईलचे अक्षरश: व्यसन लागले आहे.
मोबाईल आणि कॉम्प्युटर स्क्रिनाच्या अतिवापरामुळे अनेकांना डोळ्यांच्या कमजोरीची समस्या होत आहे.
अशात आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव केल्यास या समस्येपासून आराम मिळू शकतो.
डोळ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या 'व्हिटामिन-ए' ची शरीरामध्ये कमी झाल्यामुळे डोळे कमजोर होतात.
व्हिटामिन-ए डोळ्यांची दृष्टी, त्वचा आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खाल्ल्याने शरीरातील व्हिटामिन-एची कमतरता भरून निघते.
अंडी, पालेभाज्या, गाजर, पपई हे व्हिटामिन-एचे उत्तम स्त्रोत आहेत. याशिवाय पालक, दही, सोयाबीन आणि इतर पालेभाज्याही खाणे फायद्याचे आहे.
व्हिटामिन-ए व्यतिरिक्त व्हिटामिन बी, बी १२, व्हिटामिन-सी आणि ई हे घटक देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.
ड्रायफ्रूट्स, डाळी, लिंबू, आवळा यामधून ही जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे यांचे सेवन करणे डोळ्यांसाठी फायद्याचे आहे. ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे.