Team Agrowon
करटुली ही बारमाही वेल असून, तिला कंदयुक्त मुळे असतात. ४ मीटर लांब द्राक्षाच्या घड्यासारख्या लता तंतू असतात. भारतामध्ये मेघालय राज्यात सर्वांत जास्त प्रमाणात आढळते.
कोवळे, नाजूक, हिरव्या रंगाचे कच्चे फळ सामान्यतः भाजी म्हणून वापरले जाते. त्याच्या विशिष्ट कडसर चवीमुळे त्याचे लोकप्रियता वाढत आहे.
करटुले पिकाची पाने, फुले व कंदयुक्त मुळे यांचाही आहारामध्ये वापर करता येतो.
चांगल्या पावसानंतर जूनअखेर ते जुलै महिन्यामध्ये लागवडीला सुरुवात करावी. हे ११५ ते १२४ दिवसांचे पीक आहे.
करटुलीची लागवड केल्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यांमध्ये पीक काढणीला येते. या पिकाच्या ४ तोडणी होतात.
करटुले पिकाचे कंद ४ ते ५ वर्षांपर्यंत राहतात. लागवड बिया व कंद लावून दोन्ही प्रकारे करता येते.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पावसाळ्यातील पावसाचा अंदाज घेऊन ४ चे ५ दिवसांनी किंवा आठवड्याच्या अंतराने एक किंवा दोन वेळा पाणी द्यावे. जास्त पाणी साचू देऊ नये, अन्यथा मुळे कुजून जातात.
लागवडीनंतर साधारणतः ५० ते ६० दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते. पहिल्या वर्षी ७५ ते ८० दिवसांनी फळे तोडणी सुरू होते. दुसऱ्या वर्षी ३५ ते ४० दिवसांनी फळांची सुरू होते.
फळ हिरवे कोवळ्या स्थितीतच तोडावे. हेक्टरी साधारण ४० ते ५० क्विंटल इतके उत्पादन मिळते.