Water Conservation : नद्यांचे पाणी समुद्रात जाऊन वाया जाते? हा तर गैरसमज!

Team Agrowon

कोणत्याही नदीतून वाहणारे पाणी अखेरीला समुद्राला मिळते. या विषयी ‘हे पाणी वाया जाते’ असे बहुतांश जलतज्ज्ञ बोलताना दिसतात.

Water Conservation | Agrowon

पाण्याचे हे चक्र कोट्यवधी वर्षापासून सुरू आहे. ती जमीन व समुद्र या दोन्ही ठिकाणच्या जीवसृष्टीसाठी आवश्यक आहे.

Water Conservation | Agrowon

समुद्राची क्षारता सरासरी ३५ टक्के आहे. समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन, त्याचे बाष्प हवेत जाते. म्हणजे पाणी कमी होते आणि क्षार वाढतात.

Water Conservation | Agrowon

पण वर गेलेल्या बाष्पाचे ढग होऊन पुढे कुठेतरी पाऊस पडतो. पावसाचे पाणी नद्यांवाटे पुन्हा समुद्रात माघारी येते. या चक्रामुळेच समुद्रातील क्षारांचे ३५ टक्के प्रमाण कायम राहते.

Water Conservation | Agrowon

जर नद्यांचे सर्वच पाणी अडवले व त्या समुद्राला मिळाले नाही तर समुद्राची क्षारता किती वाढेल, याचा विचार करा. यामुळे त्यातील जीवसृष्टी हळूहळू संपुष्टात येईल.

Water Conservation | Agrowon

अन्नासाठी सागरी जिवांवर आजही आपली ४० टक्के इतकी मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यांच्या खाद्याची सोय उर्वरित जमिनीवर करणे आपल्याला शक्य आहे का?

Water Conservation | Agrowon

त्यामुळे नदयांचे पाणी समुद्रात गेले तरी ते वाया जात नाही.

Water Conservation | Agrowon