Anuradha Vipat
प्लास्टिक पिशवीत फळे ठेवणे आरोग्यासाठी आणि फळांच्या ताजेपणासाठी अजिबात योग्य नाही.
आपण अनेकदा बाजारातून फळे आणल्यानंतर ती तशीच प्लास्टिक पिशवीसह फ्रीजमध्ये किंवा बाहेर ठेवतो, परंतु या सवयीमुळे आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते.
फळे पिशवीत दीर्घकाळ राहिल्यास रसायने फळांमध्ये शोषली जातात. यामुळे शरीरात जाऊन संप्रेरकांचे असंतुलन, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
संत्री, लिंबू, बेरीज यांसारखी सायट्रिक ॲसिड आणि व्हिटॅमिन-सी युक्त फळे प्लास्टिकच्या संपर्कात आल्यास त्यातील पोषक तत्वे व अँटीऑक्सिडंट्स २-३०% पर्यंत कमी होतात.
प्लास्टिक पिशवीत हवा खेळती न राहिल्याने हा वायू आतच कोंडला जातो, ज्यामुळे फळे गरजेपेक्षा जास्त पिकतात, चव बिघडते आणि लवकर कुजतात.
पिशवी बंद असल्यामुळे आत दमट वातावरण तयार होते. हा ओलसरपणा बुरशी आणि बॅक्टेरिया वाढवण्यासाठी पोषक ठरतो.
जर तुम्हाला प्लास्टिक पिशव्या वापराव्याच लागल्या, तर त्या फक्त 'फूड-ग्रेड' आणि झिपलॉक असणाऱ्याच असाव्यात.