Team Agrowon
बांबू लागवड तंत्रज्ञान, जातीची निवड या बाबत फारसे संशोधन आपल्या देशात, राज्यात झालेले नाही.
बांबू बेटाचे आयुष्य मोठे आहे, दरवर्षी नियमित उत्पन्न घ्यायचे असल्यास परिपक्व बांबूचं काढले पाहिजे. परंतु शेतकरी मुळासकट बांबू काढत आहेत, असे झाल्यास नियमित उत्पन्न मिळणार नाही.
सध्या बहुतेक शेतकऱ्यांनी बांबू परवडणारे पीक नाही अशा समजातून कायमचे त्यातून बाहेर पडण्याची मानसिकता केली आहे. म्हणून ते मुळासकट काढत आहेत, हे बांबू शेतीच्या भविष्यासाठी योग्य नाही.
बांबू कमी दरात वजनाने विकण्यास परवडणारे नाही, बांबू तोडणी नंतर सात दिवसांच्या आत त्याच्या वजनात ३० टक्क्यांपेक्षा जास्त घट आढळून येते. या बांबूच्या झटपट वजन घटण्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही.
शेतकऱ्यांनी बांबूच्या काठ्या करून विकल्या, तर फायदा होऊ शकतो. मानवेल ही जात काठी बांबू साठी योग्य असल्याचे निदर्शनात आले. यातून आज तरी शेतकऱ्यास ३.५ ते ४ रुपये प्रतिकिलो दर मिळू शकतो.
बांबू कमी दरात वजनाने विकण्यास परवडणारे नाही, बांबू तोडणी नंतर सात दिवसांच्या आत त्याच्या वजनात ३० टक्क्यांपेक्षा जास्त घट आढळून येते. या बांबूच्या झटपट वजन घटण्याबद्दल फारसे कोणी बोलत नाही.
शेतकऱ्यांनी बांबूच्या काठ्या करून विकल्या, तर फायदा होऊ शकतो. मानवेल ही जात काठी बांबू साठी योग्य असल्याचे निदर्शनात आले. यातून आज तरी शेतकऱ्यास ३.५ ते ४ रुपये प्रतिकिलो दर मिळू शकतो.