Aslam Abdul Shanedivan
संडे हो या मंडे रोज खावो अंडे असे आपण सतत ऐकत असतो. यामागचे खरे कारण म्हणजे अंड्यातून मिळणारे असंख्य फायदे आहेत.
अंड्यांमध्ये प्रथिने असतात जे शरीराला फायदेशीर आहेत. पण त्याची कवचं ही कचरा समजून फेकली जातात.
तर अंड्याची कवचं ही कचऱ्यात टाकण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहेत. त्यांच्या वापराने आपण आपल्या किचने लूक बदलू शकतो
घरात जेवण करताना भांडी खूप जळत असतील तर डाग काढून टाकण्यासाठी अंड्याची कवचं वापरता येतील
करपलेलं निघत नसेल तर त्यात अंड्याची कवचं, थोडे गरम पाणी आणि साबण टाकूण ठेवा... आपोआप तो करपलेला निघून जाईल. भांडे स्वच्छ होईल
पावसाळ्यात घरातून कीटक दूर करण्यासाठी अंड्याच्या कवचाचा वापर करता येतो. ते घरात ठेवल्यास कीटक जातील.
अंड्याच्या कवचामध्ये असलेले कॅल्शियम माती सुपीक बनवू शकते. ते एक प्रकारे खताचे काम करते. ज्यामुळे झाडे खराब होत नाहीत