Mahesh Gaikwad
मणिपूरपासून सुरू झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप अखेर मुंबईत झाला. याचवेळी देशपातळीवरील विरोधकांच्या इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाची सभा मुंबईच्या शिवाजी पार्क येथे पार पडली. यावेळी आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते.
शिवाजी पार्क येथील सभेच्या निमित्ताने मरगळ आलेल्या काँग्रेसने भव्य शक्तिप्रदर्शन केले.
या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे, पवार आणि गांधी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या भाषणातून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करण्यात आला.
या सभेसाठी सोनिया गांधी यांच्यासह प्रियंका गांधी या देखील उपस्थित राहिल्या होत्या.
इंडिया आघाडीच्या नेत्यांना ऐकण्यासाठी राज्यभरातून काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. सभेचा परिसरात मोठ्या प्रमाणत गर्दी झाल्याचे चित्र होते.