Team Agrowon
आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष द्यायचं राहून जातं. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढू लागतात.
अनेकांना केस गळतीची तक्रार असते. दिवसभर केस गळत राहतात. पण त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपाय करूनही फरक पडत नाही.
पण हरभऱ्याचं सेवन करून केस गळतीला रोखता येऊ शकतं.
कारण हरभऱ्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे केसांची वाढ होते.
प्रोटीन आणि मॅंगनीज केस लवकर पांढरे होऊ देत नाहीत. काळ्या हरभऱ्यामध्ये त्याचं प्रमाण भरपूर असतं.
झिंक आणि व्हिटॅमिन बी ६ केस मजबूत ठेवतात. हरभऱ्यात यांचंही प्रमाण असतं. त्यामुळे केस गळतीला ब्रेक लागतो.