Aslam Abdul Shanedivan
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागाच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
सततचा पाऊस आणि शेतात पावसाचे पाणी साचल्याने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीकांचे नुकसान झाले आहे
बीड जिल्ह्यातदेखील कापूस, सोयाबीन, बाजरी, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातील वांगी बु. येथील शेतकरी पांडुरंग दशरथ जाधव यांच्या कपाशी पिकाचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे.
पांडुरंग दशरथ जाधव यांच्या कपाशी पिकाच्या बोंडांना कोंब फुटली आहेत.
यामुळे तयार झालेल्या पाढऱ्या सोन्याची झळाळी झोकाळली आहे. अख्ख कपाशी पीक वाया गेलं आहे.
हतातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने पांडुरंग दशरथ जाधव हवालदील झाले आहेत. तर सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.