Team Agrowon
प्रत्येक मंगलकार्यामध्ये पुजेसाठी सुपारीचा वेगळा मान असतो. त्यामुळे भारतात सुपारीला मोठी मागणी असते.
यंदा अवकाळी पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव असूनही गुहाघर तालुक्यात सुपारीचे भरघोस पीक आले आहे.
मात्र, बाहेरून होणाऱ्या आयातीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुपारीच्या दरात घट झाली आहे.
सुपारीचे दर घटल्याने याचा मोठा आर्थिक फटका सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
त्यामुळे सुपारीचा समावेश राज्याच्या फळबाग लागवड योजनेत करण्याची मागणी बागायतदार करत आहेत.
गुहाघर तालुक्यातली सुपारी मुंबईच्या वाशी मार्केटला जाते. तेथून ही सुपारी मोठ्या प्रमाणात गुजरातला पाठवली जाते.
मात्र, थायलंडसह कर्नाटक राज्यातून स्थानिक बाजारात कमी दराने सुपारीची विक्री केली जात आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना दर मिळत नाही.