Team Agrowon
शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी नियमित योगासन करण्याला महत्व आहे. निरोगी जीवनाच्या ही पद्धत जगाने मान्य केली आहे.
योगासनातील विविध आसनांमुळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे स्नायू मजबूत बनतात.
श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि नियंत्रीत हालचालींमुळे मन:शांती आणि एकाग्रता वाढवितात.
योग तणावासाठी एक शक्तिशाली उतारा म्हणून काम करतो.
शारीरिक स्तरावर विविध आसने करून योग अभ्यास केला जातो. त्यामुळे मन आनंदी व उत्साही राहते.
ज्ञान प्राप्तीसाठी अभ्यासाला जसे महत्व दिले जाते तसेच निरोगी व सुदृढ शरीरासाठी योगाला महत्त्व दिले जाते.
योगामुळे भूक चांगली लागते.मन प्रसन्न राहते त्यामुळे दुसऱ्या दिवसाची चिंता वाटत नाही. म्हणून आपण प्रत्येकानेच स्वतःसाठी दररोज वेळ काढून योगासने केली पाहिजे.