Team Agrowon
आज वटपौर्णिमा. या दिवशी महिला आपल्या पतीला चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.
पौराणिक कथा काहीही असली तरी वटवृक्षाचे संगोपन आणि संवर्धन गरजेचे आहे, हा संदेश या दिवशी सर्वदूर पोहोचला पाहिजे.
भारतातील अनेक शहरात आणि गावागावांत प्राचीन आणि दीर्घायुषी वडाचे वृक्ष आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे.
आपल्याला जीवन जगण्यासाठी सर्व अर्थाने वृक्षच जन्मोजन्मी राहिले पाहिजेत. हा संकल्प आणि सिद्धी खऱ्या अर्थाने वटसावित्री पौर्णिमेचा अर्थ आहे.
वडाची फळे लालचुटूक, गोलाकार आणि पानांच्या देठालगत जोडीजोडीने असतात. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात.
पानांच्या पत्रावळी जेवणाकरिता उपयोगाच्या आहेत. मुळे-पाने-चीक आणि साल या सर्वांचा औषध म्हणून उपयोग होतो.
अशा या बहुगुणी उपयोगामुळे धार्मिक अंगाने वडाच्या झाडाला महत्त्व दिलेले असावे. एक दिवस त्याची पूजा करणे प्रासंगिक आहे, पण नित्यनेमाने झाडाची देखभाल गरजेची आहे.