sandeep Shirguppe
उष्मा वाढल्याने घाम येऊन अनेकांच्या अंगाला खाज सुटते, शरीरावर घामोळ्या येतात. याचा सर्वांनाच त्रास होतो.
घामोळ्यांमुळे अंगाची आग होते, खाज सुटते, काहींना जळजळ देखील जाणवते, या समस्येने अनेकजण त्रस्त असतात.
घामोळ्यांपासून तुम्हाला सुटका करून घ्यायची आहे. घरगुती उपायांमुळे तुमची घामोळ्यांपासून लवकर सुटका होऊ शकते.
उन्हाळ्यात शक्यतो थंड पाण्यानेच अंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे, शरीर थंड राहण्यास मदत होते.
घामोळ्यांपासून बचाव करण्यासाठी झोपण्यापूर्वी त्वचेवर नारळाचे तेल लावा.
या तेलाचा नियमित वापर केल्याने उष्माघातापासून आराम मिळू शकेल. त्वचेची जळजळ आणि खाज सुटण्यापासून आराम देतात.
उन्हाळ्यात आवर्जून सूती कपडे परिधान केले जातात. कारण, या कपड्यांमुळे उष्णतेचा त्रास कमी प्रमाणात संभवतो.
या दिवसांमध्ये पांढऱ्या रंगाचे, लाईट रंगाचे सूती कपडे घालावेत. सूती कपड्यांमुळे, तुम्हाला घामोळ्यांचा त्रास जाणवणार नाही.
ही सामान्य माहिती
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही.