Team Agrowon
गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. आधी थंडी आणि नंतरच्या पावसामुळे आंबा बागेत किड, रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
किमान तापमानात घट झाल्यामुळे काही बागांमध्ये पुन्हा मोहोर येऊ शकतो.
सध्या आंबा बागा पालवी ते फळधारणा अवस्थेत आहेत. आंबा फळगळीच महत्वाच कारण म्हणजे पुनर्मोहर येणे.
किमान तापमानात घट झाल्यामुळे फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते.
अन्नद्रव्याचे वहन नवीन मोहोराकडे होऊन जुन्या मोहोराला असलेली वाटाणा किंवा गोटी आकाराची फळेही गळतात.
मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुन्हा मोहोर येण्याची प्रक्रिया टाळण गरजेच आहे.
पुनर्मोहर येऊ नये म्हणून उपाय करताना जिबरेलिक ॲसिड ५० पी.पी.एम. म्हणजेच १ ग्रॅम प्रति २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.