Anuradha Vipat
पती-पत्नीमध्ये भांडणे वाढू नयेत आणि नात्यात पुन्हा गोडवा यावा यासाठी खालील गोष्टी करणे अत्यंत फायदेशीर ठरते.
भांडण सुरू थोडा वेळ शांत राहणे उत्तम. 'शांतता' हे वादावरील सर्वात मोठे औषध आहे.
अहंकार बाजूला ठेवून स्वतःहून बोलायला सुरुवात करा.संवादाने मोठे प्रश्न सुटतात.
जुन्या गोष्टी उकरून काढल्याने भांडण मिटण्याऐवजी अधिक वाढते.
समोरच्या व्यक्तीला नक्की काय म्हणायचे आहे आणि त्यांना काय त्रास झाला आहे हे शांतपणे ऐकून घ्या.
जर तुमची चूक असेल, तर मनापासून माफी मागा. माफी मागितल्याने नात्यातील सन्मान वाढतो.
कधीकधी राग शांत होण्यासाठी दोघांनाही थोड्या वेळासाठी 'स्पेस'ची गरज असते.