Swarali Pawar
उन्हाळ्यात आइस्क्रिम खाल्लं की लगेच थंड वाटतं. पण खरंच ते शरीराची उष्णता कमी करतं का, हा प्रश्न आहे.
आइस्क्रिम थंड असल्यामुळे तोंड आणि घसा लगेच थंड होतो. पण हा परिणाम फक्त काही वेळापुरताच असतो.
आइस्क्रिममध्ये साखर आणि फॅट जास्त असतं. हे पचवताना शरीराला ऊर्जा लागते आणि उष्णता जाणवू शकते.
जास्त गोड आइस्क्रिम खाल्ल्यावर तहान वाढते. यामुळे शरीरातील पाण्याचं संतुलन बिघडू शकतं.
आइस्क्रिम पूर्ण बंद करण्याची गरज नाही. पण आठवड्यातून 2–3 वेळा, थोड्या प्रमाणात खाणं योग्य.
खूप गरमीतून लगेच आल्यावर आइस्क्रिम टाळा. सर्दी किंवा घसा दुखत असेल तरही खाऊ नका.
आइस्क्रिम खाल्ल्यानंतर पाणी प्या. आणि नेहमी संतुलित आहार ठेवण्यावर भर द्या.
आइस्क्रिम शरीराला थंड वाटतं, पण कायमचं थंड करत नाही. मर्यादित प्रमाणात खाल्लं तरच ते सुरक्षित आणि मजेदार आहे.