Anuradha Vipat
नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्यासाठी आणि मानसिक शांतता राखण्यासाठी मेंदूला सकारात्मक गोष्टींकडे वळवणे आवश्यक असते.
सततचे नकारात्मक विचार मानसिक तणाव वाढवतात, ज्यामुळे आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
जेव्हा जेव्हा तुमच्या मनात एखादा नकारात्मक किंवा भीतीदायक विचार येईल, तेव्हा मनातल्या मनात ५, ४, ३, २, १ अशी उलटी गिनती करा
तुमच्याकडे काय नाही, यावर विचार करण्यापेक्षा जे काही चांगले आहे, त्याबद्दल देवाचे किंवा नशिबाचे आभार माना.
कधीकधी मनात विचारांची खूप गर्दी होते. अशा वेळी मनात येणारे सर्व वाईट विचार एका कागदावर लिहून काढा.
जेव्हा मन अस्वस्थ होईल, तेव्हा "माझ्या नियंत्रणात फक्त आजचा दिवस आहे" हा विचार करा. दीर्घ श्वास घ्या, आजूबाजूच्या वातावरणाकडे लक्ष द्या.
रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या किमान १ तास मोबाईल वापरणे टाळा.