Anuradha Vipat
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे केसांमध्ये आर्द्रता वाढते, ज्यामुळे टाळूवर चिकटपणा आणि केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.
केस गळतीच्या या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आणि केसांचे आरोग्य राखण्यासाठी खालील उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.
पावसात केस ओले झाल्यास घरी आल्यावर लगेच स्वच्छ पाण्याने धुवा.
टाळूवरील अतिरिक्त तेल आणि चिखल साफ करण्यासाठी सौम्य, अँटी-फंगल किंवा सल्फेट-मुक्त शॅम्पूचा वापर करा.
शॅम्पूनंतर केवळ केसांच्या टोकांना कंडिशन लावा, टाळूला लावणे टाळा. यामुळे केसांचा गुंता कमी होतो.
कोरफड जेलमध्ये लिंबाचा रस मिसळून टाळूला लावा. यामुळे टाळूचा चिकटपणा आणि खाज दूर होते.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांना लावल्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.