Swarali Pawar
४०°C पेक्षा जास्त तापमानामुळे संत्रा बागेत फळगळ वाढते. योग्य व्यवस्थापन केल्यास हे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येते.
जास्त उष्णतेमुळे लहान फळे गळतात आणि झाडांवर ताण येतो. यामुळे उत्पादन आणि फळांची गुणवत्ता कमी होते.
७-८ दिवसांच्या अंतराने सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या. दुपारी पाणी देणे टाळा, कारण ते लगेच वाफ होऊन नुकसान होते.
पाण्याची कमतरता असल्यास ठिबक सिंचन सर्वोत्तम आहे. यामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि बचत होते.
झाडांच्या आळ्यात पालापाचोळा किंवा गवत टाका. यामुळे जमिनीत ओलावा टिकतो आणि तण कमी होते.
झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावल्यास रोग कमी होतात. पाणी देताना खोडाला पाणी लागू देऊ नका.
सुकलेल्या फांद्या कापा आणि बुरशीनाशक फवारणी करा. जमिनीची वखरणी करून मुळांना हवा मिळेल याची काळजी घ्या.
वेळीच उपाय केल्यास उन्हाचा ताण कमी करता येतो. यामुळे संत्रा बागेचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकून राहते.