Anuradha Vipat
पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे किचनमध्ये दमटपणा, कुबट वास आणि ओलावा निर्माण होतो यामुळे अन्नपदार्थ लवकर खराब होतात.
स्वयंपाक करताना आणि नंतर किमान १५ मिनिटे एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी नक्की चालू ठेवा.
मसाले, साखर, मीठ आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी एअर-टाईट काचेच्या बरण्या वापरा.
भांडी धुतल्यानंतर ती लगेच कपाटात ठेवू नका. पाणी पूर्णपणे निथळू द्या आणि कोरडी करूनच जागच्या जागी ठेवा.
ओले हात पुसण्याचे नेपकिन्स किंवा ओले पोचे किचनमध्ये वाळत घालू नका, यामुळे कुबट वास येतो.
किचन ओट्याची स्वच्छता करण्यासाठी पाण्यात थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचा रस मिसळा यामुळे डाग साफ होतात.
किचनच्या कपाटात एका छोट्या वाटीत थोडे खडे मीठ किंवा कॉफी पावडर उघडी ठेवा.