Swarali Pawar
उन्हाळा संपत आला की अनेक शेतकरी ठिबक संच काढून ठेवतात. पण योग्य प्रक्रिया न केल्यास संच खराब होऊ शकतो.
नळ्यांमध्ये माती, वाळू आणि कचरा साचतो. स्वच्छ पाण्याने फ्लशिंग केल्याने हे सर्व बाहेर पडते.
सुरुवातीला मुख्य लाईन, मग उपलाईन आणि शेवटी लॅटरल फ्लश करा. एंड कॅप उघडून पाणी सोडा, स्वच्छ पाणी येईपर्यंत प्रक्रिया करा.
नळ्यांमध्ये क्षार साचल्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होतो. अॅसिड ट्रीटमेंटमुळे हे क्षार विरघळून साफ होतात.
१०० लिटर पाण्यात ०.५ ते १ लिटर अॅसिड मिसळा. हे मिश्रण संचात सोडून २४ तास ठेवा, नंतर फ्लश करा.
अॅसिड नेहमी पाण्यात मिसळा, उलट करू नका. हातमोजे, मास्क आणि गॉगल वापरणं आवश्यक आहे.
शेवाळ आणि जिवाणू वाढू नयेत म्हणून क्लोरीन वापरा. २०-३० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने पुन्हा फ्लश करा.
पाईप्स उन्हात पडू देऊ नका, त्यावर आच्छादन ठेवा. उंदीर व गंजापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी संच ठेवा.