Swarali Pawar
सध्या गारपीट आणि पावसामुळे कांदा पीक धोक्यात आहे. अशा वेळी योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे.
शेतात साचलेलं पाणी ताबडतोब बाहेर काढा. पाणी साचल्यास कांद्याचं नुकसान वाढतं.
काढणीला आलेला कांदा लगेच काढून घ्या. सुकवून शक्य तितक्या लवकर विक्री करा.
काढलेला कांदा ३-४ दिवस उन्हात सुकू द्या. नंतर सावलीत ढीग करून नीट सुकवण करा.
बुरशीनाशकाची फवारणी करून रोग टाळा. यामुळे पिकाचं पुढील नुकसान कमी होतं.
१९:१९:१९ खताची फवारणी केल्यास वाढ सुधारते. नुकसान झालेल्या पिकाला नवीन ताकद मिळते.
बोरिक आम्ल फवारणीने बियांची गुणवत्ता सुधारते. कंद सडल्यास स्ट्रेप्टोमायसिन पावडर औषधाने नियंत्रण करा.
चिकटद्रव्य वापरल्याने औषधांचा परिणाम वाढतो. कीड दिसल्यास त्वरित फवारणी करून नियंत्रण करा.