Swarali Pawar
सध्या पावसामुळे ज्वारी पिकावर मोठा परिणाम होतो आहे. अशा वेळी योग्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे.
शेतात साचलेलं पाणी तात्काळ बाहेर काढा. ज्वारीला जास्त पाणी सहन होत नाही.
पिक लोळल्यास शक्य असेल तिथे हलकेच उभी करा. यामुळे पिकाची पुढील वाढ सुधारते.
जमीन खूप ओली असताना शेतात जाऊ नका. यामुळे मुळांचे नुकसान आणि माती घट्ट होते.
पीक पक्व झालं असेल तर लवकर काढणी करा. दाण्यांना कोंब फुटणे आणि बुरशी टाळता येते.
कापलेली कणसे उन्हात पसरून वाळवा. ताडपत्री वापरल्यास ओलावा कमी राहतो.
कार्बेंडाझिम किंवा मॅन्कोझेबची फवारणी करा. यामुळे दाण्यांवरील रोग नियंत्रणात येतात.
धान्यातील ओलावा १२% पेक्षा कमी ठेवा. हवेशीर आणि कोरड्या ठिकाणी साठवण करा.