Swarali Pawar
पावसाळ्यात जनावरांमध्ये घटसर्प रोगाचा धोका वाढतो. वेळेत उपचार न केल्यास हा आजार जीवघेणा ठरू शकतो.
हा रोग जिवाणूमुळे होतो आणि नाक-तोंडातील स्राव, दूषित चारा, पाणी व आर्द्र वातावरणातून पसरतो.
गाई, म्हशी, लहान वासरे तसेच शेळ्या-मेंढ्यांमध्ये या रोगाची लागण जास्त आढळते. वाढत्या वयातील जनावरे अधिक संवेदनशील असतात.
तीव्र ताप, गळ्याला सूज, श्वास घेण्यास त्रास, नाकातून स्त्राव आणि खाणे-पिणे बंद होणे ही घटसर्पाची प्रमुख लक्षणे आहेत.
लक्षणे दिसताच तातडीने पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. वेळेवर उपचार केल्यास रोग नियंत्रणात येऊ शकतो.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी घटसर्पाची लस द्या. लहान वासरांचे वेळेवर लसीकरण आणि जंतनिर्मूलन करणेही आवश्यक आहे.
गोठा स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. जनावरांना स्वच्छ चारा-पाणी द्या आणि पावसाळ्यात दूषित पाणी पिणे टाळा.
आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवा. त्यांचे खाद्य-पाणी स्वतंत्र ठेवून संक्रमित वस्तूंचे निर्जंतुकीकरण करा.