Swarali Pawar
पाने पिवळसर होऊन हरितद्रव्य कमी होते. पाने वाकडी, शेंगा कमी व लहान येतात आणि झाडांची वाढ खुंटते.
उन्हाळ्यात शेताची खोल नांगरणी करावी. काडीकचरा जाळून नष्ट केल्याने रोगकारक घटक नष्ट होतात.
रोगग्रस्त बियाण्यामुळे रोगाचा प्रसार होतो. त्यामुळे नेहमी विषाणूमुक्त व निरोगी बियाणे वापरावे.
बियाणे ५२ अंश सेल्सिअस पाण्यात २०-३० मिनिटे भिजवावे. यामुळे रोगाचा प्रसार टाळता येतो.
इमिडाक्लोप्रिड औषधाने बियाण्याची प्रक्रिया करावी. यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
ईश्वरी, खोटी, चवळी यासारखी तणे काढून टाकावीत. तसेच मूगाबरोबर ज्वारी, बाजरी, मका यांसारखी आंतरपीक घ्यावीत.
नत्रयुक्त खत शिफारशीपेक्षा जास्त देऊ नये. पिकांची फेरपालट केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो.
पिवळे चिकट सापळे शेतात लावावेत. तसेच शिफारस केलेल्या कीटकनाशकांची १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.