Aslam Abdul Shanedivan
आपण आपल्या जीवनात दररोज फळे आणि भाज्या खातो. मात्र त्याच्या साली या फेकून देतो
पण भाज्या आणि फळांच्या सालींचा पुनर्वापर करता येतो. यापासून सेंद्रिय खत बनवता येते. पण याची योग्य माहिती नसल्याने खत बनवता येत नाही.
स्वयंपाकघरातून बाहेर पडणाऱ्या ओल्या सालीला काळे सोने असे म्हणतात.
हे सेंद्रिय खत बागकामासाठी खूप उपयुक्त असते. जे पर्यावरणासाठीही चांगले असते.
भाज्या आणि फळांच्या सालींपासून खत तयार करण्यासाठी कोरडी पाने, कोको पिट, शेणखत, प्लास्टिकची बादली लागेल
यानंतर कोरडी पाने आणि कोको पिट आणि शेणखताचा थर पसरवा. ते जिथे थेट सूर्यप्रकाश पडणार नाही अशा ठिकाणी डब्बा झाकून ठेवा. त्यावर आधी मधी पाणी शिंपडत राहा
एक कंटेनर पूर्णपणे भरल्यावर दुसर्यामध्ये असेच करा, २ ते ३ महिन्यांत कंपोस्ट तयार मिळेल. जे बागेत वापरता येईल