Swarali Pawar
ऊस तोडल्यानंतर शेतात मोठ्या प्रमाणावर पाचट राहते. हे पाचट जाळू नका, कारण त्यातूनच मातीला नवी ताकद मिळते.
एका हेक्टरमध्ये साधारण ८ ते १० टन पाचट तयार होते. हेच पाचट सेंद्रिय खत म्हणून वापरता येते.
हेक्टरी ८० किलो युरिया आणि १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट वापरा. सोबत २.५ लिटर द्रवरूप जिवाणू टाकल्यास पाचट लवकर कुजते.
पाचट कुजल्यामुळे मातीतील सेंद्रिय कार्बन वाढतो. जमीन सुपीक होऊन पिकांची वाढ चांगली होते.
ऊस वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. त्यातील कार्बन खोड, पाने आणि मुळांमध्ये साठतो.
पाचट जाळल्यास कार्बन हवेत जातो आणि मातीचे नुकसान होते. पाचट जमिनीत मिसळल्यास सुपीकता वाढते आणि पर्यावरण सुरक्षित राहते.
जमिनीचा पोत सुधारतो आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. सूक्ष्मजीव वाढतात आणि रासायनिक खतांचा वापर कमी होतो.
पाचट व्यवस्थापनामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि पर्यावरणपूरक आहे.