Anuradha Vipat
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि पोटाच्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी खालील ५ सोपे आणि प्रभावी उपाय नक्की करून पहा.
जेवण शांतपणे आणि ३२ वेळा चावून खाल्ल्यास लाळ अन्नात नीट मिसळते, ज्यामुळे पचन संस्था सुलभ होते.
सकाळी उठल्यावर आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने कोमट पाणी प्यावे.
फायबरमुळे अन्नाचा मार्ग मोकळा होतो आणि पोट साफ राहते.
जेवल्यानंतर लगेच झोपण्याऐवजी किमान १० मिनिटे वज्रासनात बसावे.
रात्रीचे जेवण हलके असावे, जेणेकरून झोपेत शरीराला पचनाचा अतिरिक्त ताण पडणार नाही.
शरीरात पाण्याची पातळी योग्य असेल तर आतड्यांची हालचाल सुलभ होते आणि टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर लवकर पडतात