Swarali Pawar
रानडुक्कर, हरिण, रानगवा, नीलगाय, माकड, वानर आणि हत्ती यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे व फळझाडांचे नुकसान होते.
नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत अर्ज करावा लागतो. हा अर्ज "नमुना ३" मध्ये वनक्षेत्रपालाकडे द्यावा लागतो.
वनरक्षक, कृषी सहायक व तलाठी यांची समिती नुकसानीचा पंचनामा करते. अर्ज मिळाल्यानंतर १० दिवसांत हा अहवाल सादर करावा लागतो.
हत्तीमुळे मालमत्तेचे नुकसान झाल्यासही ७२ तासांत अर्ज आवश्यक. कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक आणि तलाठी पंचनामा करतात.
वनरक्षक प्राण्यांचे ठसे, विष्ठा व हालचाल तपासतो. तलाठी क्षेत्र अर्जदाराचेच आहे का हे पाहतो आणि कृषी सहायक नुकसानीचे मोजमाप करतो.
समिती नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची टक्केवारी नोंदवते. कृषी विभाग त्या पिकाची मागील ५ वर्षांची सरासरी उत्पादकता तपासतो.
नुकसानीच्या प्रमाणानुसार हमीभावाच्या आधारे भरपाई दिली जाते. पिकांचे नुकसान जितके जास्त, भरपाईही तितकी जास्त मिळते.
पूर्ण कागदपत्रांसह अर्ज दिल्यानंतर एका महिन्यात भरपाई मिळते. विलंब झाल्यास शासनाला ६% व्याजासह रक्कम द्यावी लागते.