Swarali Pawar
उन्हाळा आला की हिरवा चारा कमी पडतो. अशा वेळी चवळीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.
चवळीमध्ये १३ ते १५ टक्के प्रथिने असतात. म्हणून जनावरांसाठी ती पौष्टिक आणि रुचकर चारा आहे.
चवळी हे द्विदल पीक असल्यामुळे नत्र स्थिरीकरण करते. यामुळे जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारतो.
हिरव्या चाऱ्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल हा उत्तम काळ. मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी जमीन योग्य ठरते.
हेक्टरी ३०–४० किलो बियाणे लागते. बी २–३ सें.मी. खोल पेरा आणि ओळीतील अंतर २५–३० सें.मी. ठेवा.
श्वेता, ईसी ४२१६, बुंदेल लोबिया आणि युपीसी ५२८६ वाण योग्य. श्वेता वाणाला भरपूर हिरवी आणि रुंद पाने येतात.
पेरणीवेळी शेणखत आणि स्फुरद द्यावे. दर ७ ते ९ दिवसांनी पाणी देऊन एकूण ६ ते ७ पाळ्या द्याव्यात.
६०–६५ दिवसांनी, ५०% फुलोरा आल्यावर काढणी करा. योग्य वेळी काढणी केल्यास हेक्टरी २५–४० टन हिरवा चारा मिळतो.