Team Agrowon
महाराष्ट्रातील हवामान सर्व फळपिकांच्या लागवडीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक आहे. त्यामुळे सफरचंद वगळल्यास बहुतेक सर्व फळपिकांची यशस्वी लागवड करता येते.
राज्याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घेता येतात.
पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब यांसारखी फळझाडे घ्यावीत.
कोकणसारख्या अति पावसाच्या भागात आंबा, काजू, चिकू, नारळ, फणस यांसारखी फळझाडे घ्यावीत.
अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असलेल्या भागात बोर, सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घेण्याची शिफारस करण्यात येते.
हवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे, फळे लागली तरी फळांची प्रत खालावणे, उशिरा फळे लागणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या उद्भवतात.
लागवडीपूर्वी माती, पाणी परिक्षण, लागवडीसाठी उत्तम कलमांची उपलब्धता या सर्व बाबींचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचा आहे.
फळबागेचे नियोजन करताना जमिनीचा प्रकार, फळझाडांची निवड, बारमाही पाण्याची व्यवस्था, स्थानिक हवामानात कोणत्या प्रकारची फळझाडे येऊ शकतील.