Team Agrowon
भाजीपाला पिकामध्ये वेलवर्गीय पिकाला महत्व आहे. वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश होतो.
सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते.
लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे आवश्यक असते. त्यातून दर्जेदार आणि अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते.
सामान्यतः वेलीसाठी मंडप किंवा तारेच्या ताटीचा आधार देता येतो. मंडप उभारणी करताना लोखंडी खांबाचा किंवा बांबूचा वापर केला जातो.
मंडपामध्ये वेली ६ ते ७ महिने चांगल्या राहतात. जमिनीवर केवळ ३ महिने चांगल्या राहतात.
मंडपावर वाढवलेल्या वेलीची वाढ चांगली होते. फळांची संख्या अधिक राहते. उत्पादन अधिक मिळते.
मंडप पद्धतीमध्ये हवा चांगल्या प्रकारे खेळती राहत असल्याने सडण्याचे, कीड व रोगाचे प्रमाण कमी राहते. फवारणीसुद्धा व्यवस्थित करता येते.
फळाची तोडणी, खुरपणी ही कामे अत्यंत सुलभ रीतीने होतात. पिकात दोन ओळींमध्ये कमी कालावधीचे १ ते २ महिन्यांचे आंतरपीक उदा. पालेभाज्या, कोथिंबीर, पालक इ.