Team Agrowon
जमिनीचा पोत टिकविण्यासाठी हिरवळीच्या खताला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे.
हिरवळीचे पीक फुलोऱ्यामध्ये येण्यापूर्वी जमिनीत गाडल्यास त्यापासून मुख्य अन्नद्रव्ये व सेंद्रिय घटकांचा पुरवठा होतो.
हिरवळीचे खत जमिनीत अन्नद्रव्य पुरवठ्याबरोबर भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करते.
हिरवळीच्या खतासाठी धैंचा, नाग, बोरू, शेवरी, बरसीम, सुबाभूळ, गिरिपुष्प, चवळी, मूग या पिकांची लागवड करावी.
हिरवळीचे पीक भिन्न हवामान आणि जमिनीत चांगले वाढणारे असावे. पीक लवकर वाढणारे, एक ते दीड महिन्यात येणारे असावे.
प्रतिकूल परिस्थितीत उदा. दुष्काळात कमी किंवा जास्त तापमानात तग धरणारे हवे.
मुळांवर गाठी तयार करण्याची किंवा नत्र स्थिर करण्याची क्षमता असावी. पाला भरपूर, हिरवागार असावा. जमिनीत खोलवर जाणारी मुळे व खोड कोवळे, लुसलुशीत असावे. जमिनीत गाडल्यास झपाट्याने कुजावे.