Swarali Pawar
वाढत्या उन्हामुळे कोंबड्यांचं वजन आणि अंडी उत्पादन कमी होतंय का? तर हवामान बदलाचा परिणाम तुमच्या कुक्कुटपालनावर होत असू शकतो.
जास्त तापमानामुळे कोंबड्यांवर ताण येतो. त्यांचा श्वास वेगाने चालतो आणि शरीरातील संतुलन बिघडते.
उष्णतेमुळे शरीरातील कॅल्शियम कमी होते. म्हणून अंड्यांची टरफलं पातळ आणि कमजोर होतात.
खूप गरम वातावरणात पिल्लांना जुळवून घेणं कठीण जातं. त्यामुळे त्यांची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही.
उष्णतेत कोंबड्या कमी खाद्य खातात. यामुळे वजन वाढ थांबते आणि मांसाची गुणवत्ता घटते.
उष्णतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण वाढू शकते.
उत्पादन घटल्यामुळे थेट उत्पन्न कमी होते. याचा फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसतो.
उष्णतेपासून संरक्षण आणि योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. हवामान बदल लक्षात घेऊन नियोजन केल्यास उत्पादन टिकवता येते.