Anuradha Vipat
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी खालील शाश्वत नियम नेहमी पाळावेत.
घरचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ असावे, तिथे चपलांचा ढीग किंवा कचरा नसावा.
घराच्या ईशान्य दिशेला पाण्याचे स्त्रोत असावे. नळांतून पाणी टपकत असल्यास ते त्वरित दुरुस्त करा.
स्वयंपाकघर नेहमी नीटनेटके ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नका.
आठवड्यातून किमान एकदा किंवा रोज शक्य असल्यास, घर पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे.
संध्याकाळी 'शुभं करोति' म्हणताना तुळशीजवळ आणि देवापाशी दिवा लावावा.
घरात तुटलेली भांडी, बंद पडलेली घड्याळे किंवा आरसा ठेवू नका.