Anuradha Vipat
आपण लघवी रोखून धरतो पण ही सवय वारंवार केल्यास शरीराच्या उत्सर्जन संस्थेवर गंभीर परिणाम करते
जास्त वेळ लघवी रोखल्यामुळेबॅक्टेरिया मूत्राशयात वाढू लागतात, ज्यामुळे संसर्ग , जळजळ आणि वेदना होतात.
लघवी साठून राहिल्याने कालांतराने किडनी स्टोन तयार होतो.
वारंवार लघवी रोखल्यामुळे मूत्राशयाचे स्नायू ताणले जातात आणि कमकुवत होतात. यामुळे मूत्राशय पूर्ण रिकामे न होणे अशा समस्या उद्भवतात.
लघवीचा दाब मागे किडनीकडे जाऊ शकतो. यामुळे किडनीला सूज येऊ शकते
लघवी रोखून धरल्यामुळे पेल्विक स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे ओटीपोटात वेदना जाणवू शकतात.
लघवीमध्ये शरीरातील नको असलेले बॅक्टेरिया असतात.