Anuradha Vipat
पालेभाज्या आरोग्यासाठी गुणकारी मानल्या जातात, परंतु किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी काही पालेभाज्या अत्यंत नुकसानकारक ठरू शकतात.
या भाज्यांमध्ये असणारे ऑक्झॅलेट शरीरात जाऊन खडे बनवण्याची प्रक्रिया जलद करते, ज्यामुळे वेदना वाढू शकतात.
१०० ग्रॅम पालकामध्ये जवळपास ९७० मिलिग्रामपर्यंत ऑक्झॅलेट असू शकते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्यांनी पालक खाणे पूर्णपणे टाळावे.
कॅल्शियम ऑक्झॅलेट खडे वाढवण्यास ही भाजी कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे मूतखडा असेपर्यंत ही भाजी खाऊ नये.
चवीला आंबट असणाऱ्या अंबाडीच्या भाजीत 'ऑक्झॅलिक ॲसिड' मोठ्या प्रमाणात आढळते. हे ॲसिड किडनीमधील स्टोनचा आकार वाढवू शकते
जर तुम्हाला वारंवार मूतखडा होण्याचा त्रास असेल, तर या भाज्यांचे मर्यादित सेवन करावे किंवा खाणे टाळावे.
जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल, तर टोमॅटो पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. टोमॅटो भाजी किंवा आमटीत वापरताना त्यातील बिया आणि आतील गर पूर्णपणे काढून टाकावा