Swarali Pawar
अतिवृष्टीनंतर फक्त पाण्याचा निचरा करून थांबू नका. वेळीच पिकांची पाहणी केल्यास मोठे नुकसान टाळता येते.
शेतात पाणी साचले आहे का, माती वाहून गेली का ते पाहा. मुळे उघडी पडली, रोपे आडवी झाली किंवा पाने पिवळी पडली का, हेही त
शेतात पाणी जास्त वेळ साचू देऊ नका. चर काढून किंवा उपलब्ध साधनांनी पाणी त्वरित बाहेर काढा
जमीन खूप ओली असेल तर ट्रॅक्टर किंवा यंत्र वापरणे टाळा. जमीन वाफशावर आल्यानंतरच पुढील कामे सुरू करा.
वाफसा आल्यानंतर निंदणी आणि उथळ कोळपणी करा. यामुळे माती मोकळी राहते, तण कमी होतात आणि मुळांना हवा मिळते.
जास्त पावसामुळे नत्र, पालाश आणि इतर अन्नद्रव्ये वाहून जाऊ शकतात. पिकातील कमतरतेची लक्षणे पाहूनच पुढील खतांचा निर्णय घ्या.
दमट हवामानात मुळकुज, खोडकुज आणि पानांवरील रोग वाढू शकतात. पिवळे-निळे चिकट सापळे व कामगंध सापळे लावून नियमित निरीक्षण करा.
पावसानंतर काही दिवस पिकांवर विशेष लक्ष ठेवा. लक्षणे दिसताच तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करा.