Mahesh Gaikwad
उष्माघातामुळे शरीराची तापमान नियंत्रण प्रणालीमध्ये समस्या निर्माण होते. यामुळे शरीराचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त वाढू शकते. ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.
उष्माघातामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. याचा यकृत आणि पचनावर परिणाम होतो.
उष्माघातामुळे शरीरातील पाणी कमी होते. यामुळे थकवा, मळमळ, चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ शकते.
उष्माघातामुळे हृदय गतीमध्ये बदल होवू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
उष्माघातामध्ये अतिउष्णतेचा परिणाम मेंदूवर होतो. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.
उष्माघातामुळे शरीरातील द्रव पदार्थ कमी होतात. यामुळे पोट, पाय आणि हाताचे स्नायूंना वेदना होतात. शकतात.
उष्माघात आणि पाण्याच्या कमतरतेमुळे मुत्रपिंडाचे कार्य बिघडते. यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त उन्हात घराबाहेप पडणे टाळा. तसेच जंकफूड खाणे टाळा. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.