Anuradha Vipat
उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते आणि पचनशक्ती मंदावते.
उन्हाळ्याच्या या दिवसात आहार हलका, थंड आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला असावा.
तहान लागण्याची वाट न पाहता दिवसातून ३-४ लिटर पाणी प्या.
हे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित ठेवते आणि थकवा दूर करते.
आहारात दुधी भोपळा, पडवळ, काकडी, ताजी मेथी आणि कोबी यांसारख्या थंड प्रकृतीच्या भाज्या वाढवा.
काकडीत पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, ती सॅलड म्हणून खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते.
दुपारी ताक पिणे पचनासाठी सर्वोत्तम आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.