Anuradha Vipat
सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी आरोग्यदायी पेयांनी दिवसाची सुरुवात केल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
शहाळ्याचे पाणी हे शरीराला झटपट हायड्रेट करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कमी कॅलरी असलेले हे पेय सकाळी थकवा दूर करून शरीराला ताजी ऊर्जा देते.
रात्री १ ग्लास पाण्यात १ चमचा जिरे भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून गाळून प्या. हे मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते.
ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची सूज कमी करण्यास आणि हृदय सुदृढ ठेवण्यास मदत करतात.
कोरफडीचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीरातील विषारी कचरा सहज साफ होतो. यामुळे पचनसंस्था तर सुधारते.
मेथीच्या पाण्यात भरपूर फायबर असते, जे बद्धकोष्टता दूर करण्यास आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते.