sandeep Shirguppe
पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी काही खास गोष्टींचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
तुमच्या शरिराला उबदार आणि निरोगी ठेवण्यासाठी काढ्याचे सेवन करावे. यामुळे संसर्गाचा धोका दूर होतो.
पावसाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी तुळस आणि ओव्याचा काढा पिल्यास अनेक आजारांपासून बचाव होईल.
तुळशीचा काढा आणि त्याचा चहा गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
सर्दी-खोकला होऊ नये यासाठी आल्याचा काढा प्या, यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात.
पावसाळ्यात वारंवार कफ होत असेल तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्या. यामंध्ये अँटी-डिप्रेसंट गुणधर्म आढळतात.
हळद जळजळ कमी करते आणि पावसाळ्यात होणारी अॅलर्जी देखील दूर करते.
पावसाळ्यात पोटाशी संबंधित समस्या सामान्य असतात. या दूर करण्यात ओवा मदत करू शकतो.