sandeep Shirguppe
भात शिजल्यानंतर त्यातील पाणी आपण काढून टाकत असतो किंवा तसचं शिजवतो.
शिजवलेल्या तांदळाच्या पाण्याचे म्हणजे भाताच्या पेजचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
भाताच्या पेजमध्ये ब, क आणि ई जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात.
तसेच या पाण्यात कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पाणी प्यायल्यानं शरीराला ऊर्जा मिळते.
तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास असेल तर तुम्ही हे पाणी नियमीत पिले पाहिजे.
शिजवलेल्या तांदळाचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया योग्यरित्या काम करते. हे पाणी फायबरयुक्त असतं.
तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्यादेखील दूर होते. शिजवलेल्या तांदळाच्या पाण्यामध्ये मीठ टाकून पिल्यास फायदा होईल.
केस गळती, केस पांढरे होणे, वाढ खुंटण्याच्या समस्या असतील तर शिजवलेल्या तांदळाचे पाणी हा एक चांगला पर्याय आहे.
हा लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ माध्यम समुह पुष्टी करत नाही.