Mahesh Gaikwad
हिंदू धार्मिक कार्यांमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात.
तुळशीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशी असतात. आपल्याकडे जास्त करून तुळशीची पाने कधीही खाल्ली जातात. जे योग्य नाही.
आज आम्ही तुम्हाला तुळशीची पाने दिवसातील कोणत्यावेळी खायला हवी आणि त्याचे काय फायदे आहेत हे सांगणार आहोत.
सकाळी उपाशीपोटी तुळशीची कमीतकमी ५ पाने खाने आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
सकाळी उपाशीपोटी तुळशीची पाने खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटकारा मिळतो.
तुळशीची पाने खाल्ल्याने सर्दी-खोकल्याच्या आजारांपासून बचाव होतो. तसेच रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
याशिवाय सकाळी तुळशीची पाने खाल्ल्याने डोके शांत राहते.