Anuradha Vipat
वजन कमी करण्यासाठी सब्जाचे पाणी अत्यंत प्रभावी ठरू शकते. उन्हाळ्यात तर याचे फायदे दुप्पट होतात.
सब्जाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. पाण्यात भिजवल्यानंतर त्या फुगतात, ज्यामुळे ते प्यायल्यानंतर तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते.
सब्जाच्या बियांमध्ये कॅलरी खूप कमी असतात, त्यामुळे वजन वाढण्याची भीती नसते.
शरीरातील उष्णता वाढल्यास चयापचय मंदावतो. सब्जा नैसर्गिक थंडावा देतो.
सब्जा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतो, ज्यामुळे शरीरात चरबी साठण्याचे प्रमाण कमी होते.
१ ते २ चमचे सब्जा बिया अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. त्या पूर्ण फुगल्यानंतर ते पाणी तुम्ही लिंबू सरबत, ताक किंवा नुसत्या पाण्यात मिसळून घेऊ शकता.
सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाआधी अर्धा तास सब्जा पाणी पिणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते