sandeep Shirguppe
पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी काही रान भाज्या महत्वाच्या आहेत.
बाजारात मिळणाऱ्या आणि आपल्या शेतात मिळणाऱ्या रानभाज्यांमध्ये घोळची भाजी आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते.
घोळच्या भाजीत अनेक पोषक घटक असतात. महत्वाचे म्हणजे, ही लो फॅट भाजी असून यामध्ये शून्य टक्के कोलस्ट्रॉल असते.
आहारात जर घोळेच्या भाजीचा समावेश असेल तर हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण कमी होते. ब्लडप्रेशरही आटोक्यात राहते.
घोळेच्या भाजीत व्हिटॅमीन ए मोठ्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन ए ला अँटीऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते.
या भाजीत मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असल्याने वजन कमी करण्यास मदत करते.
घोळच्या भाजीचे अतिसेवन केल्याने मूतखडा म्हणजेच किडनीस्टोन होण्याचा धोका जास्त असतो.
यामध्ये Oxalic Acid चे प्रमाण जास्त असते. याबरोबरच, जर ही भाजी शिजवून खाल्ली तर यातील हे ऑक्सालिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.