Anuradha Vipat
जर तुम्ही २४ तास काहीही खाल्ले नाही, तर शरीरात अनेक चयापचय बदल घडून येतात.
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यामुळे इन्स्युलिनची पातळी घटते. यामुळे शरीरातील साठलेली चरबी जळण्यास सुरुवात होते.
सुमारे १८ ते २४ तासांनंतर शरीर स्वतःच्याच खराब झालेल्या पेशींना 'खाऊन' टाकते आणि नवीन पेशी तयार करते.
२४ तासांच्या उपवासामुळे शरीरातील 'ह्युमन ग्रोथ हार्मोन' मोठ्या प्रमाणात वाढतो.
सुरुवातीला थोडा थकवा जाणवला तरी, नंतर मेंदू अधिक सक्रिय होतो. यामुळे एकाग्रता वाढते .
जर तुम्हाला सवय नसेल, तर २४ तासांच्या उपवासात डोकेदुखी, चक्कर येणे, चिडचिड होणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो
जर तुम्हाला मधुमेह, लो ब्लड प्रेशर किंवा किडनीचे विकार असतील, तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असा उपवास करू नका.